शनिवार, २० नोव्हेंबर, २०२१
मानवतेची प्रतिष्ठा जपूया.
आयुष्याच्या रंगमंचावर आपण स्वतःला या जगासमोर व्यक्त करीत असतो. घड्याळाकडे पाहून धावणार आपलं आयुष्य, तसे पाहता ते केवळ काटे धावत असतात,जे सेल संपले किंवा काढले की बंद पडतात. वास्तविकमध्ये आपलंच आयुष्य धावत असतं सुसाट वेगाने.घड्याळाचे काटे मागे पुढे करता येतात; पण आयुष्याचे मात्र तसं नाही.आयुष्य म्हणजे मृत्यूने कधीही कोणत्याही वेळी बंद होणारे दार आहे पुन्हा कधीच न उघडण्यासाठी, तेथून परतण्याची कोणतीच वाट नाही. हे सगळ्यांनाच माहिती आहे, तरीसुद्धा आपल्या जगण्यातील खोटेपण आपण न स्वीकारता तसेच जगत राहतो.
आयुष्याच्या या अथांग पटलावर प्रत्येकाला हवे ते त्याचे अवकाश मिळावे असे वाटते.कुठलाही भेद नसावा,प्रत्येकाला केवळ माणुस म्हणुन जगता यावं! आपल्याला हवे असलेले वैभव, प्रसिद्धी, श्रीमंती ही कशासाठी हवी आहे तर केवळ एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीपेक्षा कमी लेखण्यासाठीच का? का इतरापेक्षा माझ्याजवळ हे सर्व आहे हा देखावा करण्यासाठी ?आपल्या देशांमध्ये, समाजामध्ये कितीतरी प्रश्न असतात जे आपण सहज रोज पाहतो आणि पुढे चालत राहतो; पण त्या प्रश्नामध्ये कोणीतरी जगत असतं त्याला सोडवणे महत्त्वाचं नाही का वाटत ?कोणाला नकोस वाटणारे सँडविच,पिझ्झा बर्गर म्हणून आणखीही खाण्याचे पर्याय निवडले जातात. पण कोठेतरी भाकरीसाठी आयुष्य वेचणारे लहान लहान चिमुकली सोकलेल चेहरे आपल्या नजरेत नाही का येत कधी?असे अनेक प्रश्न आहेत जेव्हा माणूस म्हणून जगण्याकडे बघितलं तर अनेक प्रश्नांचे उत्तरे मिळतील आणि आपण माणूस म्हणून त्याला सोडवण्यासाठी पुढेही होऊ; पण हे केव्हा बदलेल जेव्हा दृष्टिकोन निर्माण होईल ?स्वार्थाच्या पलीकडे जीवन काय असते हा विचार करु तेव्हा हे सर्व शक्य आहे. आयुष्याचे अंतिम सत्य मृत्यु आहे.ना इथले कोणते वैभव सोबत येणार, नाही कुठली श्रीमंती,शेवटी राहते ते केवळ नाव आणि ते ही काही काळापुरतेच.
गरीबी काय असते या शब्दाची व्याख्या आपल्याला ही करता येणार नाही,कारण या पलीकडे ती लोक जगत असतात. मनामध्ये कुठला ही अहंकार न ठेवता केवळ माणूस म्हणून नजर जरी फिरवली आपल्या अवतीभवती तर माणूसकीच्या हृदयाला पाझर फुटावा.
आपल्या जगण्यातील खोटेपणा काढून वास्तवातलं जगणं स्वीकारून माणूस म्हणून जगूया ना आपणं सर्वच!खोतेपणातील आनंद तर घेतच असतो आपणं ,आता वास्तवातील आनंद घेत जगून पाहून ना थोडं!जेथे माणूसकी म्हणून गरज वाटते तीथे मदत करूया, जेथे आपल्या हाताने कुणाचा त्रास कमी होईल ते काम करूया. आपल्या प्रतिष्ठेला ते शोभणार नाही हा खोटा विचार न करता केवळ मानव जन्माच्या माणुसकीच्या प्रतिष्ठेला ते शोभेल का? हा विचार करून माणुसकीची प्रतिष्ठा जपूया.
✍अँड विशाखा समाधान बोरकर
रा.पातुर जि. अकोला
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
एक सांगु का बाबा, तुम्ही ना मला रोज आठवता. जेव्हा कुठली मुलगी तिच्या बाबाचा हात ठेवून चालत असते. तेव्हा तुमच्या ही लाडकीचे काळीज आठव...
-
ग्रामीण भागात शिकणाऱ्या मुला- मुलींच्या शैक्षणिक समस्या हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे . प्रामुख्याने मुलींना शिक्षण घेत असताना अनेक गोष्टीचा ...
-
बाप हृदय लेकराचं बाप अवघे आकाश बाप श्वास जगण्याचा बाप घरट आयुष्याचं बाप वरून रागीट पण त्याचं हृदय फुलाच बाप पाहतो स्वप्नं आपल्या ...
-
शब्द तेच आहेत, कानामात्रा बदलला की अर्थ बदलतो.... शब्द बदलले की आम्ही ही बदलतो! आम्ही माणुसच; पण आम्हाला या शब्दांच्या मा...
-
उघडून दार शिक्षणाचे घडवली मोठी स्त्री क्रांती स्त्री शिक्षणाचे तुम्ही प्रणेता धन्य धन्य तुम्ही क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा