गुरुवार, १२ मार्च, २०२०

बाप

बाप हृदय लेकराचं
बाप अवघे आकाश
बाप श्वास जगण्याचा
बाप घरट आयुष्याचं

बाप वरून रागीट
पण त्याचं हृदय फुलाच
बाप पाहतो स्वप्नं
आपल्या उज्ज्वल भविष्याचं

बाप कष्टाचेच नाव
रातदिस ओझ फिकीरीचं
कसा चालेलं हा संसार
प्रश्न तोडते काळीज

बाप झेलतो ऊन
नसे तया कसलेच भान
बाप अस्तित्व घराचं
बाप गीता न् कुराण

बाप समजत नाही
कसा जगतो आयुष्य
त्याच्या काळजात वसे
फक्त हितच लेकराचं

बाप सागर अथांग
बाप अमृतेची ओवी
तो जळतो आयुष्य
देई प्रकाश लेकरास

बाप गरज आयुष्याची
बाप भक्कम आधार
त्याच्या नसण्याने वाटे
सुनंसुनं जगण्याचं

बुधवार, ११ मार्च, २०२०

स्वप्नांना पंख हवे....

ग्रामीण भागात शिकणाऱ्या मुला- मुलींच्या शैक्षणिक समस्या हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे . प्रामुख्याने मुलींना शिक्षण घेत असताना अनेक गोष्टीचा सामना करावा लागतो. गावामध्ये जेमतेम सातवी आठवी ते दहावीचे शिक्षण असेल आणि असेल एखादी प्रगतशील गाव तिथे बारावीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध उपलब्ध असते, पुढील शिक्षणाचा प्रश्न हा सगळ्यात ज्वलंत प्रश्न त्यांच्या समोर येऊन उभा असतो. कारण ग्रामीण भागातील मुलं ही सामान्यता शेतकरी कुटुंबातील असतात. अत्यंत हुशार आणि मेहनतीने अभ्यास करतानाही त्यांना आजही आपले स्वप्न पूर्ण करताना अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागते. घरांमध्ये असलेली आर्थिक परिस्थिती हे सगळ्यात मुख्य समस्या होऊन बसली आहे .कारण ग्रामीण भागातील लोकांकडे खाण्याचे वांदे असतात.त्यात इतके पैसे नसतात की त्यांनी त्यांच्या मुलांना बाहेरगावी शिकवण्यासाठी पैसे देऊ शकतील, या सगळ्यामध्ये आजही ग्रामीण भागामध्ये मुलींच्या शिक्षणाबद्दल पाहिजे तितका विकास झालेला नाही आणि ही मानसिकता सुद्धा अजूनही जास्त प्रमाणात बदललेली आपल्याला दिसत नाही. मग असे असताना ज्या मुलींचे स्वप्न शिक्षण घेऊन मोठे अधिकारी व्हायचे असेल त्यांना मात्र या सगळ्या प्रश्नांना तोंड द्यावे लागते. बाहेर गावी शिक्षण म्हटल्यानंतर आई-वडिलांना प्रश्न पडतो तो म्हणजे पैशाचा, शेतकरी कुटुंबात असणारा हा अत्यंत ज्वलंत प्रश्न हा मात्र आजही तितक्याच प्रमाणात आहे. जेमतेम बारावीपर्यंत किंवा पदवी पर्यंत या मुलींचे कसेतरी शिक्षण होते यामध्ये मुख्यता बीए वगैरे करणारे मुले मुली पुढे त्यांना कुठलाही मार्ग सापडत नाही. कारण बी ए नंतर काय हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो कुठेही नोकरी मिळवण्यासाठी इंजिनियर, मेडिकल, वकील या सगळ्या मोठ्या मोठ्या पदव्या मिळवल्याशिवाय आजही नोकरी मिळत नाही .या सगळ्या परिस्थितीमध्ये या मुला -मुलींचे शिक्षण मात्र अधांतरीच राहून जाते .शिक्षणाचे स्वप्न पहाणं हे आजच्या ग्रामीण भागातील मुला- मुलींसाठी अत्यंत कठीण होत चाललेल आहे. ग्रामीण भागातील मुलींच्या समस्या समजून घेणे महत्त्वाचे आहे मोठ्या प्रमाणात बेरोजगारचिन्ह सगळीकडे दिसत आहेत असे असतानाही एक स्त्री वर सुद्धा आज कौटुंबिक जबाबदारी आलेली आहे. जेव्हा मुल मुली शिकतील तेव्हा ते स्वतःच्या पायावर उभे राहतील आणि शिक्षणावरच सगळं काही करता येते , शिक्षण हे कधीही वाया जात नाही ते आपल्या कृषी क्षेत्रापासून ते प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला आपल्या शिक्षणाचा उपयोग करता येतो. आजही ग्रामीण भागातील शेतकरी स्त्री पुरूष हे सुशिक्षित असणे अत्यंत महत्त्वाची आहे.त्यामुळे आपल्या ज्ञानाचा वापर आपल्या शेतीच्या भरघोस उत्पादन घेण्यासाठी लावून चांगले उत्पादन घेऊन आपल्या कुटुंबाला हातभार लावू शकतात आणि या सगळ्या पद्धतीनुसार आपल्या समाजाला ,गावाला एक नवीन आदर्श देऊ शकते .अशी कितीतरी उदाहरणे आज आपल्या समाजामध्ये घडतांना दिसत आहेत हे सगळे असतानाही हा आजच्या मुला- मुलींची शैक्षणिक परिस्थिती बदलणे आवश्यक आहे तेव्हा आपल्या ग्रामीण भागातील महिला मुली आणि मागासलेल्या विभागाची प्रगति होणे आवश्यक आहे. कारण शैक्षणिक प्रगती मधूनच समाजाच्या प्रत्येक स्तरावरची प्रगती ही आपण शिक्षणाच्या बळावरच करू शकतो, कारण शिक्षण ही अंधारातून प्रकाशाकडे नेणारी वाट आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुला- मुलींना येणाऱ्या शैक्षणिक अडचणींना समजणे महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातून शहरी भागाकडे प्रवास करताना तासन्तास बस ची वाट पाहणे स्टॅण्डवर उभे असताना नाना प्रकारच्या समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते .अशा सगळ्या प्रश्नांचा विचार करून आपल्याला शिक्षण घ्यायचे आहे त्यामुळे निमूटपणे सहन करीत ह्या मुली आपले शिक्षण घेत असतात. गावामध्ये उपलब्ध नसलेलं शिक्षण यामुळे या होतकरू हुशार मुला- मुलींचे स्वप्नही कधी स्वप्नच राहून जाते.ज्यांचे ध्येय मोठे आहे त्यांचे ध्येय तिथेच विरून जातात. ज्यांनी शहरी भागांमध्ये मार्ग वळला त्यांचे स्वप्न कुठेतरी अंकुरायला लागते पण या सगळ्या गोष्टी मध्ये या होतकरू आणि हुशार मुला- मुलींच नुकसान होतं.नुकसान केवळ एका मुली वा मुलाच नसून एका गावाच आहे ,समाजाचे आणि राष्ट्राचे असतं. त्यामुळे शिक्षणाला आजच्या दृष्टिकोनातून आजच्या ग्रामीण भागातील मुला मुलींची शैक्षणिक अवस्था समजून त्याच्यावर उपाय योजना काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त शाळा महाविद्यालय सुरु करुन या सगळ्या मुलाना पदवी झाल्यानंतर रोजगार उपलब्ध करून दिला गेला पाहिजे .त्यांच्या स्वतःच्या पायावर उभ राहता येइल. त्यांना कसल्याही प्रकारची तडजोड करून शैक्षणिक मदत करणे गरजेचे आहे .ग्रामीण भागातील शहरी भागांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्पेशल फक्त मुलींची बस चालू करणे, ज्यामुळे त्यांना सहज आणि कुठलाही त्रासाविना आपले शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करता येईल ,ग्रामीण भागातील या समस्या अत्यंत विदारक आहेत.आपण कधीतरी प्रत्यक्षात जाऊन बघितलं तर अंगावर काटा उभा राहतो. कारण शिक्षणाच्या बाबतीत जिथे जिथे मागासलेला भाग आहे तिथे मुलींचा बालविवाह करण्यात येतो लपून-छपून का होईना असे प्रकार सर्रास ग्रामीण भागांमध्ये पाहण्यास मिळतात हे कुठेतरी थांबले पाहिजे कायद्याने त्या बालविवाहाला बंदी आहे पण शिक्षणाचा अभाव असल्यामुळे या सगळ्या गोष्टी आजही आपल्या समाजातला काळिमा फासणाऱ्या घडत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाचे स्वप्न हे स्वप्न न राहता ते पूर्ण होऊन त्यांच्या स्वप्नांना भरारी घेता यावी याकरिता शासनाने गावपातळीवर मोठ्या प्रमाणात शाळा महाविद्यालय खोलून गावातील शिक्षणापासुन वंचित मुला मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देऊन आपला देश सबळ करण्यासाठी पावले उचलणे महत्त्वाची आहे.जेव्हा आपल्या देशातील गावातील प्रत्येक व्यक्ती शिकलेली असली तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या देशाची प्रगती झाली असे म्हणता येईल.शेवटी या या निरागस स्वप्नांना पंख मिळू द्या आणि बेधुंदपणे त्यांना आपल्या आकाशात झेप येऊ द्या..


अॅड विशाखा समाधान बोरकर
पातुर

शनिवार, ७ मार्च, २०२०

घेऊ द्या तिला उंच झेप आकाशी.....



स्त्री देशातील महत्त्वाचा घटक आहे पण आजही स्त्रीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह दिसून येतात.पूर्वीपासून ते आजच्या एकविसाव्या शतकात पर्यंतचा इतिहास पाहिला तर स्त्रीजीवन हे कुठे सुरक्षित नसून असे दिसून येते . गाव शहर दिल्ली असो वा गल्ली असो तिच्यावरील अत्याचाराची कथा अजूनही संपलेली नाही. महिलांवर होणारे अत्याचार देशहितस बाधक ठरत आहे. स्त्री ही अबला नसून सबला आहे हे तिने केव्हाचेच सिद्ध केले आणि आजही करत आहे, पण आज देश एवढा पुढे गेल्यावर सुद्धा आईला तिच्या लहान मुलीला कोठे पाठवताना विचार करावा लागतो. देश पुढे गेला पण मानसिकता मात्र तिथेच खिळून बसलेली आहे.लहान मुली असो अथवा महिला त्यांच्या मनात एक असुरक्षेची धास्ती भरलेली असते, जेव्हा समाजात रक्षकच भक्षक होताना दिसतात. तेव्हा आपण आपले सामर्थ्य पणाला लावून आपल्या सुरक्षेसाठी सामर्थ्यवाण असले पाहिजे. स्त्री अबला नसून सबला आहे
पणती आहे तू दोन्ही अंगणातील
तू प्रतीक आहे वात्सल्याचि
उठ ही लढाई लढण्यासाठी
कोणी न परतून पाहे
तूच स्वतःसाठी क्रांती कर
तुच स्वतःची रक्षक आहे
स्त्री अथवा मुलीच्या सुरक्षेच्या जेव्हा मुद्दा येतो तेव्हा त्या घरातील व्यक्तीवर अवलंबून राहतात. परंतु नेहमीचे त्या लोकांसोबत असणार का? अन नसले तर आपली शिखर गाठण्याचे थांबून देणार का? तुमच्या हक्कावर कोणी गदा ठेवलं तुम्ही केव्हा निमूटपणे पाहण्याचे काम करणार का?असे कितीतरी प्रश्न उभे राहतात. स्त्री जीवन सुरक्षित कसे राहता येईल त्याचे सक्षमीकरण सबलीकरण करता येईल यासाठी अनेक कार्यक्रम राबवले जात असतानाही आजही आपल्या अॅसिड़ अटॅक असो किंवा बलात्कार ,विनयभंग यासारख्या मानवाला लाजिरवाण्या गोष्टी समाजामध्ये क्षणोक्षणी घडताना दिसतात. कुठेतरी कुणातरी मुलींचा कुणीतरी निष्पाप जिवांचा कुठेतरी जिव जातो. या सगळ्या कारणांमुळे आपण आपल्या देशाची प्रगती करीत आहोत का किंवा आपल्या देशाची अधोगती चालू आहे आपला देश किती पुढे चालला आहे, आपल्या देशाचे संरक्षण आपण किती प्रमाणात करत आहोत, आणि या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्या समाजाची प्रगती कुठपर्यंत आली .आपण या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करणे सगळ्यात महत्त्वाची आहे. कारण आपण जेव्हा सुरक्षेचा मुद्दा घेऊन बसतो तेव्हा सगळेच नाना प्रकारचे आपले आपले मत मतांतर मांडतात आणि सगळं करत असताना.हे सर्व असताना स्त्रियांनी मात्र आपण सक्षम आहोत आपल्या स्वतःचे सामर्थ्य वाढवून स्वसंरक्षणाचे धडे घेतले पाहिजे. त्यांनी दाखवून दिले पाहिजे की आम्ही कुठे कमी नाही आहोत. आमच्या मनगटामध्ये स्वतःचे अस्तित्व घडवण्याचे सामर्थ्य आहे.आज देशातील कोणतेच पद नावे जिथे महिला आपले कर्तव्य बजावत नसतील आज देशाचे संरक्षणमंत्री असो अथवा राष्ट्रपती व पंतप्रधान अंतराळवीर असो प्रत्येक क्षेत्रांमध्ये स्त्रियांनी आपल्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा उमटलेल्या आहेजर एक महिला आपल्याकर्तुत्वाच्या बडा तून देशाच्या सुरक्षेची जबाबदारी पेलू शकतात तर तुम्ही-आम्ही स्त्रिया मुली युवती स्वतःचे संरक्षण का करू शकत नाही? पक्षी पाखराला पंख फुटले की त्याचे पंख वाढावे यासाठी फांद्यावरून खाली ढकलतात त्यांचा मानस त्यांना इजा पोहोचण्याची नसतो तर पाखरांच्या पंखात बळ घेऊन तेव्हा उंच भरारी घेता यावी हा असतो हा पक्षाच्या आदर्श पालकानी घेतला पाहिजे त्यांनी आपल्या मुलीच्या मनातील असुरक्षिततेची भावना काढून त्यांना संरक्षणाचे धडे दिले पाहिजे आई-वडिलांनी मुलिंना चांदण्यासारखे नाहीतर प्रखर तेजस्वी सूर्याप्रमाणे बनवावे त्यांच्याकडे पाहण्यासाठी डोळे उघडून पाहण्याचे सामर्थ्य कोणात नसले पाहिजे. त्यामुळे मुलींनी आपण काहीच करू शकत नाही म्हणून हातावर हात ठेवून बसून नये तर स्वतःच्या सुरक्षेसाठी कणखर बनले पाहिजे . आजच्या काळातील विज्ञानवादि युगामध्ये समाजातील स्त्रीची भूमिका लक्षात घेता आजच्या स्त्रीची ही प्रगती आहे ही अधोगती आहे, या बद्दल मनामध्ये शंका तयार होते. कारण एकीकडे तिची वाढणारी गगनचुंबी भरारी आहे तर एकीकडे तिच्या श्वासाला आजही कोंडून ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. मग हे सगळं चालू असताना तिला मात्र आजही आपल्या हक्काचं स्थान निर्माण करण्यासाठी युगा युगा पासूनचा जो संघर्ष चालू आहे तो आजही चालु आहे. हा संघर्ष कधीच थांबणार हा मनात सदैव छळणारा प्रश्न तिचा हा संघर्ष कधी थांबणार हा प्रश्न मनात सतत चालू असते दिल्लीतील निर्भया असो गावातील खैर्लंजली मधील निष्पाप पिडिता असो, काय चुकतंय मुलींचं त्यांच्यावर अत्याचार होऊन त्यांच्या आयुष्याला संपवून टाकण्यात येतं की त्यांच मुलगी असणं हा त्यांचा सगळ्यात मोठा गुन्हा आहे का? त्यांच्या अस्तित्वावर आजही प्रश्न उत्तर असतात. त्यांच्या राहणीमानावर त्यांच्या कपड्याला त्यावर त्यांनी काय घालाव काय नाही हे ठरवलं जाते.आज समाज घडवताना स्त्रिचा खारीचा वाटा आहे पण
असे असतानाही तिच्या अस्तित्वाला आजही दुय्यम समजण्यात येते, हा केल्या जाणारा पुरुषसत्ताक समाजाचा सगळ्यात मोठा कपट प्रयत्न आहे .ज्या मुलीवर अत्याचार होतात त्यावर निषेध करणारे हात कमी असतात पण त्यांच्या कपड्यावर त्यांनी काय घालाव काय नाही असे अकलेचे तारे तोडत तिचीच अवहेलना करणारे आपल्या समाजातीला काही महाभाग आहेत.हे पाहुन आपला समाज किती पुढे गेलाय आपल्या समाजाची किती मानसिकता बदलली आपला समाज किती मानसिकता आहे बदलण्याची सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला येतो. काय ती मुलगी पुन्हा परत येईल का कुणाचे आयुष्य असे संपवून टाकले जाते. अलीकडे तर एक ट्रेड होऊन बसलाय ,कोण्या निष्पाप जिवावर अत्याचार झाला की सगळेजण हातात मेणबत्त्या घेऊन मोर्चा काढतात. काय होईल त्या मूक मोर्चा काढल्याने. आणखी किती मूक मोर्चे काढणार आपण मोठ्या मोठ्या मेणबत्त्या आणि जळणारे त्यावर मेणबत्त्या सारखे आणखीन किती मुलींना जळताना पाहणारा ?पण हा विचार आपण नाही तर कोण करणार? मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा हा ज्वलंत मुद्दा आहे. त्यामुळे आपल्या सभोवताली मुलींना आधी सुरक्षित करा आणि ही जबाबदारी प्रत्येक भारतातील नागरिकांनी प्रत्येक समाजातील घटकांना स्वतःचे कर्तव्य म्हणून सांभाळली तर महिला मुली कुठेही सुरक्षित असतील अस वाटतं . सुरक्षा ही कुठेही विकत मिळणारी वस्तू नसून सुरक्षाही प्रदान करावी लागत असते . मुलगी जरी सक्षम झाल्या तरी आपल्या समाजातील दृष्टिकोनही तितकाच बदलणे गरजेचे आहे . रस्त्याने जाणाऱ्या मुलींना जर तुम्ही सुरक्षेची एक भिंतीचे कवच म्हणून जर तुम्ही वावर करत असाल तर कुठलाही समाज कुठलाही मुलीमध्ये कुठल्याही समाजामध्ये कोणतीही मुलगी कुठल्याही अत्याचाराला बळी पडणार नाही.हे जर आपण केलं तर आजही आपल्या भारताच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये मुली सुरक्षित होणार आणि मुलींनी सुद्धा आपले कर्तव्य माणूस स्वतःच्या संरक्षणासाठी कार्य केले पाहिजे. समाजासाठी समाजातील इतर मुलीसाठी कार्य केले पाहिजे या उच्चपदस्थ महिला आहेत त्यांनी या ग्रामीण भागातील मुलींकडेप्रामाणिकपणे लक्ष देऊन त्यांच्या हितार्थ काही करता येईल का त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काही करता येईल का याच्या विचार नक्की करावा. कायद्याच्या दृष्टिकोनातून तिला वेळोवेळी पावलोपावली न्याय मिळत गेला आणि मिळतो आहे पण हे सगळं करत असताना त्या निष्पाप जीवाचा बळी जातो कधी त्या निष्पाप जीवाला आपल्या अस्तित्व गमवावे लागते.त्यामुळे त्यांचे अस्तित्व त्यांचे पुन्हा परत येत नाही त्यामुळे महिलांनी सर्वात अधिक कायद्याचे महत्त्व आपल्या जीवनात समजून घेऊन आपल्या कायद्यात माहिती करून घेणे आपला अधिकार काय आहे, आपले कर्तव्य काय आहेत या गोष्टीचं ज्ञान हे आजच्या मुलींना असळे पाहिजे महाविद्यालयीन युवतीने आपले लक्ष आपल्या कणखर ध्येयावर ठेवुन सामर्थ्यवान घडले पाहिजे. तेव्हा त्यांनी सांगितले पाहिजे की आम्ही लेकी आहोत जिजाऊच्या ,सावित्रीच्या त्यामुळे उगाच आम्हाला कमजोर समजु नका वसा आम्हाला त्यांचा हा वसा आमच्या मना मनात रुजलेला आहे आणि हेच सामर्थ्य तुम्ही येणाऱ्या जगामध्ये रुजवावा. त्यामुळे कुठल्याही वेळेस मुलीकडे पाहतांना तयाचे डोळे लाजले पाहिजे. मुलींनी स्वतःला कणखर बनवले पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचे.
यांनी स्वतःच्या जीवनाचा मार्ग स्वतः निवडला पाहिजे स्वतःला सक्षम बनवून सिद्ध केले पाहिजे कारण स्त्री आदर्श विश्व घडू शकते. नेहमी स्त्री सक्षमीकरणावर बोलले जाते पण बोलून दाखवतात त्यांच्या मुळाशी जाणे महत्त्वाचे आहे असे पाहिल्‍यास शहरी भागातील महिला पुढे गेल्या पण योग्य ते मार्गदर्शन न मिळल्याने ग्रामीण महिलांमध्ये अजूनही त्या स्थितीत खितपत पडलेले आहेत .म्हणून सक्षमीकरणाचे पावले ग्रामीण भागातून करण्यासाठी सुरुवात करण्याची महत्त्वाची बाब आहे ही सक्षमीकरणाची क्रांती सगळ्यानी एकत्र येऊन करणे महत्त्वाचे आहे. तेव्हा ही स्त्री ही खऱ्या अर्थानेआपले अस्तित्व आणखीन प्रामुख्याने सिद्ध करू शकते. शेवटी स्त्री सक्षम झाली तेव्हा देश सक्षम होईल म्हणून घेऊ द्या तिला उंच झेप आकाशी..

अॅड विशाखा समाधान बोरकर
पातुर