शनिवार, २४ जुलै, २०२१

'दिक्षा" समाजाला नवी दिशा देणारा लघुचित्रपट...!



सध्या परिस्थिती मध्ये दिशा भटकलेला युवा पिढीला मार्ग दाखवणारा लघुचित्रपट प्रदर्शित झाला. आपल्या लिखाणाने सर्वांच्या हृदयावर राज्य करणारे हृदय मानव अशोक यांनी लेखन आणी दिग्दर्शित केलेला दीक्षा हा लघु चित्रपट अतिशय सुंदर आणि नव्या स्वरूपात प्रेक्षकांच्या समोर आला.
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना विनम्र अभिवादन करून पुढे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना विचाराच वादळ मनात पेटून उठलेल्या समाजाच्या अनिष्ट मानसिकतेवर घणाघाती घाव करणारे यांच्या वादळात गुंतलेला युवक पुस्तकाच्या गारवा संस्काराच्या सावलीतून देण्याचे स्वप्न पाहत अभिवाद करतो.हा मिळेल त्याच्याशी स्नेहाने संवाद करतो. विचारांच्या धुंदीत बेधुंद घेऊन चालतो.काही तरी बदल घडवू पाहतो,,, माणसांच्या गर्दीत विचारांच्या दर्दीत हरवलेला युवक एका वडापावच्या गाडीजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीतून पाणी पितो. आणि वडापाव आहे का अशी विचारणा करतो.वडापावच्या गाडीचा मालक त्या कामगाराला त्या युवकाला वडापाव देण्यात बोलतो आणि तो इतिहासाच्या पुस्तकातील असलेले संविधान प्रास्ताविकेचे पान फाडतो हे सदर तो युवक पाहत असतो.तो त्याला ते प्रस्ताविकेचे पान फाडण्यास रोखतो,त्या कामगाराला बाजुला नेत त्याला त्या प्रस्ताविकेचे महत्व सांगतो.दिक्षा या मुलीवर वैचारिक खरे प्रेम करणारा युवक,त्याचे हे वैचारिक प्रेम त्याच्या जवळच्या काही मीत्रांना मात्र कळत नाही.दोघांची एकच विचारसरणी,एकच दिशा आणी ध्येय ही एकच ..!ही चार पाच मित्रे प्रस्ताविका या 26 जानेवारीला जनतेला वाटायचे ठरवतात.आणि त्या मार्गाने लागतात.तर तिकडे याच विचाराने,पेटून उठलेली दिक्षा आपणास भेटते या संपूर्ण लघुचित्रपटामध्ये दीक्षा या मुलीची समाजाकरिता धडपडणारी कहाणी दाखवण्यात आली आहे. घरामध्ये असलेल्या अंधश्रद्धेचा विळखा तिला नकोसा वाटतो. वेळोवेळी ती विरोधही करते आणि तिला संविधानाच्या प्रास्ताविकेचे मूल्य आपलेसे वाटतात. दिक्षा ही संघर्षाने पेटून उठते.ती तिच्या मैत्रिणीला काही वेगळे करू पहायचे म्हणते,,,आणी तिच्याही मनात संविधान प्रस्ताविका लोकांना वाटायचा विचार येतो..ती एका प्रेसला भेट देते,त्याला त्याबाबतचे विचारते,तिला तिथे मोठ्या प्रमाणावर प्रस्ताविका छापलेल्या दिसतात.छपाईकामगाराचे लक्ष नसल्याचे पाहुन दिक्षा त्या प्रास्ताविका हळूच आपल्या बैगमध्ये टाकते.आणि चोरुन घेतलेल्या त्या प्रस्ताविकेचा जनमानसात अगदी जीव ओतून महत्व सांगण्याचा तिचा प्रवास सुरु होतो.इकडे ही युवक मंडळी प्रस्ताविका होण्याची वाट पाहतात;पण तिथे जावुन विचारणा केली असता त्यांच्या हाती लागत नाहीत ,पुन्हा ते युवक प्रस्ताविका मिळवून नव्याने समाजात घरोघरी जाऊन,प्रत्येक माणसाला त्याचे महत्व पटवून देतात,या संपुर्ण कामात अनेक चांगले लोक त्यांना भेटतात.प्रोत्साहन देतात.दीक्षा ची आई अंधश्रद्धेवर मध्ये पूर्णता डुबलेली असते त्यातून मार्ग काढण्यासाठी दीक्षा अनेक प्रयत्नही करते;पण तिला चुप राहण्याचे घरातील तिला सांगतात. दीक्षा हे सर्व करीत असताना गोंधळून जाते पण आपल्या विचारांच्या ज्वालाला ती शांत ठेवत नाही तर संविधानाच्या प्रस्ताविका वाटण्याचा वसा ती चालूच ठेवते.या प्रस्ताविका चोरुन आणते हा मुद्दा पटत नाही मनाला, पण घरातील भौतिक परिस्थिती लक्षात घेता आणि तिची कर्तव्य दृष्टी लक्षात घेता तिच्या धैर्यशील वृत्तीला सलाम करावासा वाटतो.समाजात समता, स्वातंत्र्य, बंधुता,ही मूल्ये रुजविण्यासाठी तिचा तो वसा कौतुकास्पद आहे.या संपूर्ण लघुचित्रपटामध्ये शीतल साठे यांचे अतिशय अंगाला शहारे आणणारे सुंदर गीत आहे. या गीतामधुनी नवी प्रेरणा,नवी उर्जा निर्माण होते.
सोडून दीक्षा आपला प्रस्ताविका वाटत येते आणि तिकडून तो दीक्षावर वैचारिक प्रेम करणारा युवक आणि त्याचे मित्र मंडळी यांची एकत्र भेट होते. दीक्षा हा प्रस्ताविका चोरून आणून लोकांना वाटण्याच्या बाबात सांगते. एक दिवस घरातिल अंधश्रद्धेला कंटाळून सर्व जमा करून ती एका ठिकाणी घेऊन येते. आणि सर्वांची मित्रपरिवार ही पुन्हा नव्याने तिथे जमा होतात. आणि संविधान प्रास्ताविकेचे वाचन करतात. त्या दोघांचे वैचारिक प्रेम पुन्हा नव्या मार्गावर सुरू होते. एक दिशा ठरवून समाजासाठी कार्य करणारे पुन्हा नव्याने एका मार्गावर आरुढ होतात. अशाप्रकारे आजच्या बेताल जगणार्‍या युवकांना त्यांच्या वेळेचा सदुपयोग कसा करावा संविधानाचे महत्त्व व त्याचे मूल्य समाजासाठी किती महत्त्वाचे आहे आणि आपण काय करू शकतो या संपूर्ण प्रेरणा देणारा लघुचित्रपट आहे. लघु चित्रपट असला तरीही या चित्रपटांमधून अनेक मुलतत्वे आणि गोष्टी आजच्या समाजासाठी खूप प्रेरणादायी बाबी आहेत. या सारख्या चित्रपटाची आज आपल्या समाजाला नितांत गरज आहे. त्या माध्यमातून भारतिय संविधान, संविधानाची प्रस्ताविका, संविधान प्रास्ताविका मध्ये असलेल्या गोष्टी या माध्यमातून लोकांना समजणे आवश्यक आहे. चित्रपट हा समाजाच्या मानसिकतेवर प्रभाव टाकणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. दिक्षा या लघु चित्रपटातून केलेला हा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे. या चित्रपटामधील पूर्ण कलाकाराचे त्यांनी बजावलेल्या कामगारी बाबत खूप खूप अभिनंदन💐💐💐💐💐💐
✍अँड.विशाखा समाधान बोरकर 
24/07/2021
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿