शनिवार, २० जून, २०२०

बाबा म्हणजे प्रेमाचा झरा.....


  बाबा म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठा आधार वाटणारा सर्वात मोठा प्रेमाचा सागर........ मुलांच्या आयुष्यामध्ये बाबांना खूप वेगळं स्थान असतं.जेव्हा मुलं आपला आधार आपला आत्मविश्वास गमावून बसतात तेव्हा बाबा तो आत्मविश्वास पुन्हा त्यांच्या चेहऱ्यावर परत आणतात. जेव्हा अख्ख जग विरोधात गेल तरी, पण बाबांचा तू पुढे जा हा शब्द कुठल्याही मुलाला प्रेरणा देत कुठल्याही प्रसंगाला पुढे जाण्याची प्रेरणा देणारा असतो. त्यामुळे बाबा म्हणजे वरुन कितीही कड़क असले तर आतून त्यांचं काळीज फार प्रेमळ असतं. आपली काळजी करणार असतं. कधीकधी मुलांना बाबा खूप कडक वाटतात. बाबा प्रेम करत नाहीत असं वाटते. पण हे मुळात चुकीच आहे. बाबांच प्रेम हे मुलांना कधी जाणवत नाही कारण त्यांना दिसत केवळ आईचं प्रेम.आई लहानपासून मुलांना जपते खाऊ पिऊ घालते त्यांना जपते त्यांना आपल्या मायेच्या सावलीत वाढवत त्यांच्या प्रत्येक चुकांवर ती त्यांना क्षमा करते पण जेव्हा बाबांची गोष्ट येते तेव्हा मुलांना बाबांच प्रेम मात्र कळतच नाही.....मुळात बाबा आणि आई दोघेही आपल्या आयुष्याचे दोन पंख असतात. बाबा बाबा असतो ना त्याच्या मध्ये श्रीमंताची तरी येत ना.
गरीब त्या प्रेमामध्ये कुठल्याही प्रकारची दरी केव्हा येत नाही.... प्रत्येक बाबाच्या काळजामध्ये आपल्या मुलाच्या उज्वल भविष्याची स्वप्ने असतात .आपल्या मुलांनी मोठे व्हावे काहीतरी बनावे ,स्वतःला सिद्ध करावे, त्यासाठी त्यांनी परिस्थितीची आव्हाने पेलावी या सगळ्या विचाराचे बाबा आपल्या मुलांना बाळकडू पाजत असतात, पण कधीकधी अपेक्षांचे ओझे वाटून मुलं त्यांच्या स्वप्नांना अधांतरी सोडतात . बाबा कधीच मुलांवर अपेक्षांचे ओझे ठेवत नसतात तर त्यामध्ये स्वप्न असतात ही बाब मुलांनी लक्षात घ्यावी. आपल्यापेक्षा त्यांनी दोन दिवस जास्त बघितलेली असतात....... आजच्या मुलांचा ट्रेड असतो बाबा काळ बदलला,या
बद्दल तुम्हाला कळत नाही. ही बाब मुळात चुकीची आहे तर बाबांना त्यांच्या अनुभवातून आजच्या काळाला अनुसरून काय पावले उद्या दृष्टीने टाकता येतं हे त्यांच्या शिवाय चांगला कोणीही ओळखत नाही..

त्यांच्या अनुभवाची वर्षी ही आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवसाची कठीण परिस्थिती, स्पर्धाही दूर करत असते .कारण जेव्हा आपल्याला कुठल्याही प्रकारे समस्यांना तोंड द्यावे लागतात तेव्हा बाबा त्यांच्या अनुभवातून आपल्याला त्यातून मार्गक्रमण कसं करावं लागतं हे आपल्या अनुभवातून शिकवत असतात. आपल्या स्वप्नांवर अंकुश ठेवून जो आपल्या मुलाच्या उज्वल भविष्यासाठी आपल्या फाटलेल्या कपड्या कडे कधी बघत नाही तो बाप असतो................ उद्या मुलांची स्वप्न उज्वल घडावी, त्यांची स्वप्न पूर्ण व्हावी, त्यांची ध्येय पूर्ण व्हावी, त्यांनी मोठ्या आकाशी झेप घ्यावी, यासाठी जो आपल्या स्वप्नांचा चुराडा करतो तो बाप असतो ........... त्याच्या हाताला घाव असताना त्याला आपल्या यशाच्या शिखरावर जाताना जो आपले घाव विसरतो आणि बेभान होऊन काम करतो तो बाप असतो......
मुलांच्या एका मागणीवर तो जीवाचा आटापिटा करत त्याची मागणी दुसऱ्या दिवशी पूर्ण करतो तो बाप असतो ..........आपले संपूर्ण आयुष्य मुलांच्या कल्याणासाठी वेचणारा बाप जेव्हा म्हातारा होतो तेव्हा त्याच्या हृदयावर घाव घालणारे मुलेही काही आहेत. ज्यामध्ये त्याने इतक्या कष्टातून आपल्या मुलांसाठी जो काही कष्टाचा मळा फुललेला असतो त्याला मुलं म्हणतात की तुम्ही आमच्यासाठी काय कमावलं तो दिवस त्या बापासाठी त्याच्या आयुष्यात केलेल्या कामाचा झालेला अपमान वाटतो. कारण संपूर्ण आयुष्य त्याच्या मुलाचे चांगले जावे याकरिता अख्खे आयुष्य एक एक पैसा जमा करून फुलवण्याची स्वप्न पाहतो असे करूनही जेव्हा अशी मुले त्यांना असे प्रश्न विचारतात. खरे तर अशी मुले मुळात ते वडिलांच्या लायकीचे नसतात. ज्यांना आपल्या वडिलांच्या मेहनतीचे मोल नाही अशी मुले आजही आपल्या समाजामध्ये कलंक म्हणून वावरतांना दिसतात. वडिलांच प्रेम काय असतं हे त्यांना विचारा ज्यांना वडील कसे असतात हे माहीत नाही ......त्यांचे वडील जन्मताच वारले किंवा ज्यांचे वडील त्यांच्या आयुष्याची वाट अधांतरी असतानाच सोडून गेले..... त्यांना विचारा वडिलांचे प्रेम काय असतं ....त्यामुळे ज्यांचा कडे हे आहेत त्यांनी त्या बाबाचं काळीज त्यांचं प्रेम जपा त्यांना कधीच दुखवू नका ...त्यांचे आयुष्य प्रेमाने भरून टाका तुम्हालाही माहीत नाही की तुमच्या एका हसण्यासाठी त्यांनी तुमच्या साठी किती तरी त्याग केलेला आहे त्यांच्या आयुष्यामध्ये ...... तुमच्या एका हट्टासाठी त्यांनी आपले कितीतरी स्वप्न जाळले असतील त्यांची परतफेड आपण कधीच करू शकत नाही पण निदान त्यांना दुखवून त्यांना त्रास तरी देऊ नका ........ आई-वडील आपल्या आयुष्यातले दोन व्यक्ती आहेत जे आपल्यावर आयुष्यभर कुठलाही प्रकारे कुठलाही निस्वार्थी प्रेम करतात त्या प्रेमाची तुम्ही किंमत समजा....... आज काल आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त असलेल्या मुलांना आपल्या आई-वडिलांना ओळखायला त्यांना वाचायला त्यांना समजून घ्यायला वेळ नाही कारण जेव्हा फादर डे मदर डे असे असतात त्यामध्ये आजची पिढी ऑनलाइन शुभेच्छा देण्यासाठी बिझी असते पण घरामध्ये त्यादिवशी निदान तरी आपल्या आई-वडिलांना ग्लासभर पाणी देण्यासाठी यांच्याजवळ वेळ नसतो..बाबां व आईंना खरंतर जितकं प्रेम दिलं तितकं कमी असते. त्यांनी आपल्यावर केलेले उपकार आपल्यासाठी केलेले कष्ट इतके असतात की आपण आयुष्यभर जरी त्यांची परतफेड केली तरी आपण आपले अख्खे आयुष्य ही त्यांचे उपकाराची तिळमात्रही परतफेड करु शकत नाही. इतके आई-वडिलांचे उपकार आपल्या आयुष्यावर असतात . दोन चांगले विचार वाचून माणूस घडत नसतो, तर ते दोन विचार आत्मसात करून आपल्या आई-वडिलांना जपून आयुष्य घडत असते . बाहेरची व्यक्ती आपल्यासाठी काही करत नाही तरी आपण तिच्यासाठी किती आटापिटा करतो तीने आपले नाव चांगले काढवे यासाठी किती प्रयत्न करतो पण पण आपल्या जन्मदात्या आई वडिलांसाठी आपण हे का करीत नाही केवळ समाजामध्ये नाव ,प्रतिष्ठा, इज्जत, मिळावी लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं याच्यासाठी चांगलं जगाव का......? की त्यांनी आपल्या साठी आयुष्य वेचलं त्या आई-वडिलांच्या प्रेमाचं थोडं तरी मोल करून त्यांना भरभरून प्रेम द्याव, हा विचार का करू नये. तेव्हा ज्या बाबांनी आपल्याला आयुष्यभर जपले त्या बाबांचा आयुष्य आता आपण खूप सारं चांगला प्रेमाने फुलवू या त्यांच्या घावावर आपल्या प्रेमाच्या दोन शब्दांनी मलम लावू या यामुळे त्यांनी आयुष्यभर केलेल्या कष्टाच्या जखमेवर मलम लावून त्यांच्या वेदना कमी करून त्यांचे आयुष्य फुलवू या..... बाबा हा तो प्रेमाचा झरा असतो जो कधीच कधीच आटत नाही त्यामुळे या प्रेमाच्या झर्यामध्ये सर्वांनी आकंठ डुबले पाहिजे .बाबांच्या आयुष्याचं सार्थक तेव्हाच होतं जेव्हा त्यांची मुलं चांगली प्रगती करून आदर्श व्यक्ती म्हणून जगतात. आणि आपण सर्वांनी तसेच करून आपल्या आई-वडिलांना सदैव आपल्यावर गर्व वाटेल असेच वागून त्यांचे नाव लौकिक केले पाहिजे . शेवटी बाबा या शब्दावर कितीही लिहिले तरी बाबा शब्द स्वतः एक मोठविश्व आहे या मध्ये सर्वांनाच प्रेम मिळतं ,हे विश्व शांत असतं ,प्रेमळ असतं, निवांत शीतल छाया देणारा असतं ही छाया प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये राहावी अशी प्रेमळ सावली म्हणजे बाबा नावाचं हृदय असतं........

गुरुवार, १८ जून, २०२०

जगुन पहावं थोडं आपल्यासाठी.........


आपण आयुष्य किती वर्षे जगतो याच्यापेक्षा आपण आयुष्य कसे आणि किती चांगल्या प्रकारे जगतो हे महत्त्वाचे असते. एखादा माणूस छोट्याशा आयुष्यामध्ये कधी कधी मोठे काम करून जातो तर तेच काम मोठ्या माणसाला आयुष्यभर करता येत नाही. माणूस सगळं आयुष्य हे अनुभवातून शिकत असतं अनुभवाचं पुस्तक हे जगातील सगळ्यात पुस्तकापेक्षा मोठं आहे. आपण किती पुस्तक वाचले हे कधीही महत्त्वाचं नसते, महत्वाचे असते आपण त्या पुस्तकांमधून काय घेतो ,अनुभवाचे पुस्तक वाचण्यासाठी कधीकधी आई-वडिलांच्या हृदयामध्ये झाकून पाहिले पाहिजे.जगात कोणीही करील नाही, कोणीही करणार नाही, एवढा मोठा त्याग कसा करायचा हे आई-वडिलांचे हृदय वाचल्या नंतर समजून जाते .मोठं शिक्षण घेतल्यानंतर कालपर्यंत सामान्य जीवन जगणारी मुलगा अचानक मोठे झाल्यानंतर, मोठ्या पदावर गेल्यानंतर त्यांना सामान्य वाटणाऱ्या आई वडिलांचा कमीपणा वाटायला लागतो , त्यांची साधी बोली त्यांचं राहणीमान यांनी त्यांचा जणू अपमानच होतो समाजामध्ये, अशी एक नाही तर अनेक उदाहरणे आपल्या समाजामध्ये पाहायला मिळतात . माणूस आयुष्य तर जगतो पण तो सदैव लोकांसाठी जगतो. कोण काय म्हणेल हा जणू त्याच्या प्रतिष्ठेचा विषय बनून जातो .प्रतिष्ठा जपता जपता माणसाला हव असलेल आयुष्य तो जगतो का.......? हा विचार एकदा तरी माणसाने करावा. लहान पासून सुरू झालेला आयुष्याच्या प्रवासात कधीतरी कुठेतरी थांबणार आहे आणि हे निश्चितच असते त्यामुळे इतरांचा विचार न करता आपले आयुष्य काही वेळासाठी तरी आपल्या मनाने जगून पहावे .इतरांचा विचार करता करता आपल्या लोकांना दुखवू नये.शेवटी प्रतिष्ठेच्या कोरड्या भिंतीत अडकलेल्या मनाला एक वेळ बंधनमुक्त करून पहा आणि जगा आपल्याला हवा असलेला आयुष्य निर्भिडपणे ,कुठलाही विचार न करता स्वच्छंदपणे , तेव्हा मुक्तपणे फुलुद्या मनामध्ये आयुष्याचे गीत ,आणि गात रहा आपल्या धुंदीत..........