शनिवार, १९ नोव्हेंबर, २०२२

काळोख


दूर काळोखातुन आवाज येतोय
गुदमरलेल्या हुंदक्यांचा...
सूर्याची किरणे आजही तेथे गेलीच नाहीं
त्या भयावह काळोखाला दूर करायला..!
नि:शब्द भावना
नि:शब्द आक्रोश
नि:शब्द वेदना
दाखवून जातात काही
अव्यक्त जखमांचे व्रण..!
मनाला त्रास देणारा इथला भेदभाव
नेहमीच मानवतेवर हसून जाई..!
त्या काळोखाला सूर्य कधी दिसेल
हाच विचार अन्यायांच्या भिंती करू लागतात
वेदना कसल्या त्या
जग मान्य जगणेच ते!
जातीच्या भिंती ...
लिंग भेदभाव... 
गरीब -श्रीमंत
ह्या मिटल्या पाहिजेत पाट्या
आणि गिरवली पाहिजेत मानवतेची अक्षरे...!
रक्ताच्या रंगाला नाही रें भेदभाव
हृदय, श्वास, वेदना
सर्वांना सारख्याचं ना?
मग कशालाच हवीत हे
अमानवातेचे मुखवटे
शाळेच्या भिंतीत ही ...!
खरे तर तिथूनच प्रवास सुरु होतो
माणसा माणसात भेद करायचा..!
शाळा असावी माणूस घडवणारी
दिशा दाखवणारी
भेदभाव मिटवणारी
माणूसपण जगवणारी
पण ती हि धार्मिकतेची शाल पांघरून घेते
आणि पुन्हा बाल मनापासून
ही बीजे रुजायला लागतात..
घर, शाळा, समाज
इथेच घडतो खरा माणूस
आणि तो घडत जातो
म्हणून हा मनात दाटलेला अंधार
मिटला पाहिजे आधी इथूनच ...!
इथे मानवतेचा सूर्य उगवला पाहिजेत आधी..!
तेव्हाच प्रकाशणार समाज
मानवतेच्या छायेत 
भेदभाव विसरून..!
✍ऍड. विशाखा समाधान बोरकर
रा. पातूर जि. अकोला 
20/11/2022