बुधवार, ११ मार्च, २०२०

स्वप्नांना पंख हवे....

ग्रामीण भागात शिकणाऱ्या मुला- मुलींच्या शैक्षणिक समस्या हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे . प्रामुख्याने मुलींना शिक्षण घेत असताना अनेक गोष्टीचा सामना करावा लागतो. गावामध्ये जेमतेम सातवी आठवी ते दहावीचे शिक्षण असेल आणि असेल एखादी प्रगतशील गाव तिथे बारावीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध उपलब्ध असते, पुढील शिक्षणाचा प्रश्न हा सगळ्यात ज्वलंत प्रश्न त्यांच्या समोर येऊन उभा असतो. कारण ग्रामीण भागातील मुलं ही सामान्यता शेतकरी कुटुंबातील असतात. अत्यंत हुशार आणि मेहनतीने अभ्यास करतानाही त्यांना आजही आपले स्वप्न पूर्ण करताना अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागते. घरांमध्ये असलेली आर्थिक परिस्थिती हे सगळ्यात मुख्य समस्या होऊन बसली आहे .कारण ग्रामीण भागातील लोकांकडे खाण्याचे वांदे असतात.त्यात इतके पैसे नसतात की त्यांनी त्यांच्या मुलांना बाहेरगावी शिकवण्यासाठी पैसे देऊ शकतील, या सगळ्यामध्ये आजही ग्रामीण भागामध्ये मुलींच्या शिक्षणाबद्दल पाहिजे तितका विकास झालेला नाही आणि ही मानसिकता सुद्धा अजूनही जास्त प्रमाणात बदललेली आपल्याला दिसत नाही. मग असे असताना ज्या मुलींचे स्वप्न शिक्षण घेऊन मोठे अधिकारी व्हायचे असेल त्यांना मात्र या सगळ्या प्रश्नांना तोंड द्यावे लागते. बाहेर गावी शिक्षण म्हटल्यानंतर आई-वडिलांना प्रश्न पडतो तो म्हणजे पैशाचा, शेतकरी कुटुंबात असणारा हा अत्यंत ज्वलंत प्रश्न हा मात्र आजही तितक्याच प्रमाणात आहे. जेमतेम बारावीपर्यंत किंवा पदवी पर्यंत या मुलींचे कसेतरी शिक्षण होते यामध्ये मुख्यता बीए वगैरे करणारे मुले मुली पुढे त्यांना कुठलाही मार्ग सापडत नाही. कारण बी ए नंतर काय हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो कुठेही नोकरी मिळवण्यासाठी इंजिनियर, मेडिकल, वकील या सगळ्या मोठ्या मोठ्या पदव्या मिळवल्याशिवाय आजही नोकरी मिळत नाही .या सगळ्या परिस्थितीमध्ये या मुला -मुलींचे शिक्षण मात्र अधांतरीच राहून जाते .शिक्षणाचे स्वप्न पहाणं हे आजच्या ग्रामीण भागातील मुला- मुलींसाठी अत्यंत कठीण होत चाललेल आहे. ग्रामीण भागातील मुलींच्या समस्या समजून घेणे महत्त्वाचे आहे मोठ्या प्रमाणात बेरोजगारचिन्ह सगळीकडे दिसत आहेत असे असतानाही एक स्त्री वर सुद्धा आज कौटुंबिक जबाबदारी आलेली आहे. जेव्हा मुल मुली शिकतील तेव्हा ते स्वतःच्या पायावर उभे राहतील आणि शिक्षणावरच सगळं काही करता येते , शिक्षण हे कधीही वाया जात नाही ते आपल्या कृषी क्षेत्रापासून ते प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला आपल्या शिक्षणाचा उपयोग करता येतो. आजही ग्रामीण भागातील शेतकरी स्त्री पुरूष हे सुशिक्षित असणे अत्यंत महत्त्वाची आहे.त्यामुळे आपल्या ज्ञानाचा वापर आपल्या शेतीच्या भरघोस उत्पादन घेण्यासाठी लावून चांगले उत्पादन घेऊन आपल्या कुटुंबाला हातभार लावू शकतात आणि या सगळ्या पद्धतीनुसार आपल्या समाजाला ,गावाला एक नवीन आदर्श देऊ शकते .अशी कितीतरी उदाहरणे आज आपल्या समाजामध्ये घडतांना दिसत आहेत हे सगळे असतानाही हा आजच्या मुला- मुलींची शैक्षणिक परिस्थिती बदलणे आवश्यक आहे तेव्हा आपल्या ग्रामीण भागातील महिला मुली आणि मागासलेल्या विभागाची प्रगति होणे आवश्यक आहे. कारण शैक्षणिक प्रगती मधूनच समाजाच्या प्रत्येक स्तरावरची प्रगती ही आपण शिक्षणाच्या बळावरच करू शकतो, कारण शिक्षण ही अंधारातून प्रकाशाकडे नेणारी वाट आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुला- मुलींना येणाऱ्या शैक्षणिक अडचणींना समजणे महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातून शहरी भागाकडे प्रवास करताना तासन्तास बस ची वाट पाहणे स्टॅण्डवर उभे असताना नाना प्रकारच्या समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते .अशा सगळ्या प्रश्नांचा विचार करून आपल्याला शिक्षण घ्यायचे आहे त्यामुळे निमूटपणे सहन करीत ह्या मुली आपले शिक्षण घेत असतात. गावामध्ये उपलब्ध नसलेलं शिक्षण यामुळे या होतकरू हुशार मुला- मुलींचे स्वप्नही कधी स्वप्नच राहून जाते.ज्यांचे ध्येय मोठे आहे त्यांचे ध्येय तिथेच विरून जातात. ज्यांनी शहरी भागांमध्ये मार्ग वळला त्यांचे स्वप्न कुठेतरी अंकुरायला लागते पण या सगळ्या गोष्टी मध्ये या होतकरू आणि हुशार मुला- मुलींच नुकसान होतं.नुकसान केवळ एका मुली वा मुलाच नसून एका गावाच आहे ,समाजाचे आणि राष्ट्राचे असतं. त्यामुळे शिक्षणाला आजच्या दृष्टिकोनातून आजच्या ग्रामीण भागातील मुला मुलींची शैक्षणिक अवस्था समजून त्याच्यावर उपाय योजना काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त शाळा महाविद्यालय सुरु करुन या सगळ्या मुलाना पदवी झाल्यानंतर रोजगार उपलब्ध करून दिला गेला पाहिजे .त्यांच्या स्वतःच्या पायावर उभ राहता येइल. त्यांना कसल्याही प्रकारची तडजोड करून शैक्षणिक मदत करणे गरजेचे आहे .ग्रामीण भागातील शहरी भागांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्पेशल फक्त मुलींची बस चालू करणे, ज्यामुळे त्यांना सहज आणि कुठलाही त्रासाविना आपले शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करता येईल ,ग्रामीण भागातील या समस्या अत्यंत विदारक आहेत.आपण कधीतरी प्रत्यक्षात जाऊन बघितलं तर अंगावर काटा उभा राहतो. कारण शिक्षणाच्या बाबतीत जिथे जिथे मागासलेला भाग आहे तिथे मुलींचा बालविवाह करण्यात येतो लपून-छपून का होईना असे प्रकार सर्रास ग्रामीण भागांमध्ये पाहण्यास मिळतात हे कुठेतरी थांबले पाहिजे कायद्याने त्या बालविवाहाला बंदी आहे पण शिक्षणाचा अभाव असल्यामुळे या सगळ्या गोष्टी आजही आपल्या समाजातला काळिमा फासणाऱ्या घडत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाचे स्वप्न हे स्वप्न न राहता ते पूर्ण होऊन त्यांच्या स्वप्नांना भरारी घेता यावी याकरिता शासनाने गावपातळीवर मोठ्या प्रमाणात शाळा महाविद्यालय खोलून गावातील शिक्षणापासुन वंचित मुला मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देऊन आपला देश सबळ करण्यासाठी पावले उचलणे महत्त्वाची आहे.जेव्हा आपल्या देशातील गावातील प्रत्येक व्यक्ती शिकलेली असली तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या देशाची प्रगती झाली असे म्हणता येईल.शेवटी या या निरागस स्वप्नांना पंख मिळू द्या आणि बेधुंदपणे त्यांना आपल्या आकाशात झेप येऊ द्या..


अॅड विशाखा समाधान बोरकर
पातुर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा