शनिवार, ७ मार्च, २०२०

घेऊ द्या तिला उंच झेप आकाशी.....



स्त्री देशातील महत्त्वाचा घटक आहे पण आजही स्त्रीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह दिसून येतात.पूर्वीपासून ते आजच्या एकविसाव्या शतकात पर्यंतचा इतिहास पाहिला तर स्त्रीजीवन हे कुठे सुरक्षित नसून असे दिसून येते . गाव शहर दिल्ली असो वा गल्ली असो तिच्यावरील अत्याचाराची कथा अजूनही संपलेली नाही. महिलांवर होणारे अत्याचार देशहितस बाधक ठरत आहे. स्त्री ही अबला नसून सबला आहे हे तिने केव्हाचेच सिद्ध केले आणि आजही करत आहे, पण आज देश एवढा पुढे गेल्यावर सुद्धा आईला तिच्या लहान मुलीला कोठे पाठवताना विचार करावा लागतो. देश पुढे गेला पण मानसिकता मात्र तिथेच खिळून बसलेली आहे.लहान मुली असो अथवा महिला त्यांच्या मनात एक असुरक्षेची धास्ती भरलेली असते, जेव्हा समाजात रक्षकच भक्षक होताना दिसतात. तेव्हा आपण आपले सामर्थ्य पणाला लावून आपल्या सुरक्षेसाठी सामर्थ्यवाण असले पाहिजे. स्त्री अबला नसून सबला आहे
पणती आहे तू दोन्ही अंगणातील
तू प्रतीक आहे वात्सल्याचि
उठ ही लढाई लढण्यासाठी
कोणी न परतून पाहे
तूच स्वतःसाठी क्रांती कर
तुच स्वतःची रक्षक आहे
स्त्री अथवा मुलीच्या सुरक्षेच्या जेव्हा मुद्दा येतो तेव्हा त्या घरातील व्यक्तीवर अवलंबून राहतात. परंतु नेहमीचे त्या लोकांसोबत असणार का? अन नसले तर आपली शिखर गाठण्याचे थांबून देणार का? तुमच्या हक्कावर कोणी गदा ठेवलं तुम्ही केव्हा निमूटपणे पाहण्याचे काम करणार का?असे कितीतरी प्रश्न उभे राहतात. स्त्री जीवन सुरक्षित कसे राहता येईल त्याचे सक्षमीकरण सबलीकरण करता येईल यासाठी अनेक कार्यक्रम राबवले जात असतानाही आजही आपल्या अॅसिड़ अटॅक असो किंवा बलात्कार ,विनयभंग यासारख्या मानवाला लाजिरवाण्या गोष्टी समाजामध्ये क्षणोक्षणी घडताना दिसतात. कुठेतरी कुणातरी मुलींचा कुणीतरी निष्पाप जिवांचा कुठेतरी जिव जातो. या सगळ्या कारणांमुळे आपण आपल्या देशाची प्रगती करीत आहोत का किंवा आपल्या देशाची अधोगती चालू आहे आपला देश किती पुढे चालला आहे, आपल्या देशाचे संरक्षण आपण किती प्रमाणात करत आहोत, आणि या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्या समाजाची प्रगती कुठपर्यंत आली .आपण या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करणे सगळ्यात महत्त्वाची आहे. कारण आपण जेव्हा सुरक्षेचा मुद्दा घेऊन बसतो तेव्हा सगळेच नाना प्रकारचे आपले आपले मत मतांतर मांडतात आणि सगळं करत असताना.हे सर्व असताना स्त्रियांनी मात्र आपण सक्षम आहोत आपल्या स्वतःचे सामर्थ्य वाढवून स्वसंरक्षणाचे धडे घेतले पाहिजे. त्यांनी दाखवून दिले पाहिजे की आम्ही कुठे कमी नाही आहोत. आमच्या मनगटामध्ये स्वतःचे अस्तित्व घडवण्याचे सामर्थ्य आहे.आज देशातील कोणतेच पद नावे जिथे महिला आपले कर्तव्य बजावत नसतील आज देशाचे संरक्षणमंत्री असो अथवा राष्ट्रपती व पंतप्रधान अंतराळवीर असो प्रत्येक क्षेत्रांमध्ये स्त्रियांनी आपल्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा उमटलेल्या आहेजर एक महिला आपल्याकर्तुत्वाच्या बडा तून देशाच्या सुरक्षेची जबाबदारी पेलू शकतात तर तुम्ही-आम्ही स्त्रिया मुली युवती स्वतःचे संरक्षण का करू शकत नाही? पक्षी पाखराला पंख फुटले की त्याचे पंख वाढावे यासाठी फांद्यावरून खाली ढकलतात त्यांचा मानस त्यांना इजा पोहोचण्याची नसतो तर पाखरांच्या पंखात बळ घेऊन तेव्हा उंच भरारी घेता यावी हा असतो हा पक्षाच्या आदर्श पालकानी घेतला पाहिजे त्यांनी आपल्या मुलीच्या मनातील असुरक्षिततेची भावना काढून त्यांना संरक्षणाचे धडे दिले पाहिजे आई-वडिलांनी मुलिंना चांदण्यासारखे नाहीतर प्रखर तेजस्वी सूर्याप्रमाणे बनवावे त्यांच्याकडे पाहण्यासाठी डोळे उघडून पाहण्याचे सामर्थ्य कोणात नसले पाहिजे. त्यामुळे मुलींनी आपण काहीच करू शकत नाही म्हणून हातावर हात ठेवून बसून नये तर स्वतःच्या सुरक्षेसाठी कणखर बनले पाहिजे . आजच्या काळातील विज्ञानवादि युगामध्ये समाजातील स्त्रीची भूमिका लक्षात घेता आजच्या स्त्रीची ही प्रगती आहे ही अधोगती आहे, या बद्दल मनामध्ये शंका तयार होते. कारण एकीकडे तिची वाढणारी गगनचुंबी भरारी आहे तर एकीकडे तिच्या श्वासाला आजही कोंडून ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. मग हे सगळं चालू असताना तिला मात्र आजही आपल्या हक्काचं स्थान निर्माण करण्यासाठी युगा युगा पासूनचा जो संघर्ष चालू आहे तो आजही चालु आहे. हा संघर्ष कधीच थांबणार हा मनात सदैव छळणारा प्रश्न तिचा हा संघर्ष कधी थांबणार हा प्रश्न मनात सतत चालू असते दिल्लीतील निर्भया असो गावातील खैर्लंजली मधील निष्पाप पिडिता असो, काय चुकतंय मुलींचं त्यांच्यावर अत्याचार होऊन त्यांच्या आयुष्याला संपवून टाकण्यात येतं की त्यांच मुलगी असणं हा त्यांचा सगळ्यात मोठा गुन्हा आहे का? त्यांच्या अस्तित्वावर आजही प्रश्न उत्तर असतात. त्यांच्या राहणीमानावर त्यांच्या कपड्याला त्यावर त्यांनी काय घालाव काय नाही हे ठरवलं जाते.आज समाज घडवताना स्त्रिचा खारीचा वाटा आहे पण
असे असतानाही तिच्या अस्तित्वाला आजही दुय्यम समजण्यात येते, हा केल्या जाणारा पुरुषसत्ताक समाजाचा सगळ्यात मोठा कपट प्रयत्न आहे .ज्या मुलीवर अत्याचार होतात त्यावर निषेध करणारे हात कमी असतात पण त्यांच्या कपड्यावर त्यांनी काय घालाव काय नाही असे अकलेचे तारे तोडत तिचीच अवहेलना करणारे आपल्या समाजातीला काही महाभाग आहेत.हे पाहुन आपला समाज किती पुढे गेलाय आपल्या समाजाची किती मानसिकता बदलली आपला समाज किती मानसिकता आहे बदलण्याची सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला येतो. काय ती मुलगी पुन्हा परत येईल का कुणाचे आयुष्य असे संपवून टाकले जाते. अलीकडे तर एक ट्रेड होऊन बसलाय ,कोण्या निष्पाप जिवावर अत्याचार झाला की सगळेजण हातात मेणबत्त्या घेऊन मोर्चा काढतात. काय होईल त्या मूक मोर्चा काढल्याने. आणखी किती मूक मोर्चे काढणार आपण मोठ्या मोठ्या मेणबत्त्या आणि जळणारे त्यावर मेणबत्त्या सारखे आणखीन किती मुलींना जळताना पाहणारा ?पण हा विचार आपण नाही तर कोण करणार? मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा हा ज्वलंत मुद्दा आहे. त्यामुळे आपल्या सभोवताली मुलींना आधी सुरक्षित करा आणि ही जबाबदारी प्रत्येक भारतातील नागरिकांनी प्रत्येक समाजातील घटकांना स्वतःचे कर्तव्य म्हणून सांभाळली तर महिला मुली कुठेही सुरक्षित असतील अस वाटतं . सुरक्षा ही कुठेही विकत मिळणारी वस्तू नसून सुरक्षाही प्रदान करावी लागत असते . मुलगी जरी सक्षम झाल्या तरी आपल्या समाजातील दृष्टिकोनही तितकाच बदलणे गरजेचे आहे . रस्त्याने जाणाऱ्या मुलींना जर तुम्ही सुरक्षेची एक भिंतीचे कवच म्हणून जर तुम्ही वावर करत असाल तर कुठलाही समाज कुठलाही मुलीमध्ये कुठल्याही समाजामध्ये कोणतीही मुलगी कुठल्याही अत्याचाराला बळी पडणार नाही.हे जर आपण केलं तर आजही आपल्या भारताच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये मुली सुरक्षित होणार आणि मुलींनी सुद्धा आपले कर्तव्य माणूस स्वतःच्या संरक्षणासाठी कार्य केले पाहिजे. समाजासाठी समाजातील इतर मुलीसाठी कार्य केले पाहिजे या उच्चपदस्थ महिला आहेत त्यांनी या ग्रामीण भागातील मुलींकडेप्रामाणिकपणे लक्ष देऊन त्यांच्या हितार्थ काही करता येईल का त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काही करता येईल का याच्या विचार नक्की करावा. कायद्याच्या दृष्टिकोनातून तिला वेळोवेळी पावलोपावली न्याय मिळत गेला आणि मिळतो आहे पण हे सगळं करत असताना त्या निष्पाप जीवाचा बळी जातो कधी त्या निष्पाप जीवाला आपल्या अस्तित्व गमवावे लागते.त्यामुळे त्यांचे अस्तित्व त्यांचे पुन्हा परत येत नाही त्यामुळे महिलांनी सर्वात अधिक कायद्याचे महत्त्व आपल्या जीवनात समजून घेऊन आपल्या कायद्यात माहिती करून घेणे आपला अधिकार काय आहे, आपले कर्तव्य काय आहेत या गोष्टीचं ज्ञान हे आजच्या मुलींना असळे पाहिजे महाविद्यालयीन युवतीने आपले लक्ष आपल्या कणखर ध्येयावर ठेवुन सामर्थ्यवान घडले पाहिजे. तेव्हा त्यांनी सांगितले पाहिजे की आम्ही लेकी आहोत जिजाऊच्या ,सावित्रीच्या त्यामुळे उगाच आम्हाला कमजोर समजु नका वसा आम्हाला त्यांचा हा वसा आमच्या मना मनात रुजलेला आहे आणि हेच सामर्थ्य तुम्ही येणाऱ्या जगामध्ये रुजवावा. त्यामुळे कुठल्याही वेळेस मुलीकडे पाहतांना तयाचे डोळे लाजले पाहिजे. मुलींनी स्वतःला कणखर बनवले पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचे.
यांनी स्वतःच्या जीवनाचा मार्ग स्वतः निवडला पाहिजे स्वतःला सक्षम बनवून सिद्ध केले पाहिजे कारण स्त्री आदर्श विश्व घडू शकते. नेहमी स्त्री सक्षमीकरणावर बोलले जाते पण बोलून दाखवतात त्यांच्या मुळाशी जाणे महत्त्वाचे आहे असे पाहिल्‍यास शहरी भागातील महिला पुढे गेल्या पण योग्य ते मार्गदर्शन न मिळल्याने ग्रामीण महिलांमध्ये अजूनही त्या स्थितीत खितपत पडलेले आहेत .म्हणून सक्षमीकरणाचे पावले ग्रामीण भागातून करण्यासाठी सुरुवात करण्याची महत्त्वाची बाब आहे ही सक्षमीकरणाची क्रांती सगळ्यानी एकत्र येऊन करणे महत्त्वाचे आहे. तेव्हा ही स्त्री ही खऱ्या अर्थानेआपले अस्तित्व आणखीन प्रामुख्याने सिद्ध करू शकते. शेवटी स्त्री सक्षम झाली तेव्हा देश सक्षम होईल म्हणून घेऊ द्या तिला उंच झेप आकाशी..

अॅड विशाखा समाधान बोरकर
पातुर

1 टिप्पणी: