सोमवार, १० ऑगस्ट, २०२०
आठवण...
खूप खूप कळलाय
प्रत्येक गोष्टीत जणू मज
बाबा माझा दिसलाय
ती पुस्तकाची अलमारी
तो टेबलावरचा पेपर
जणू क्षणापूर्वी तो
बाबांनी वाचून ठेवलाय
चहाचा कप हाती घेताना
त्या गप्पा खूप आठवतात
नकळत डोळ्यांमध्ये
विरहाचे अश्रूही साठवतात
.तो चहाचा कप हाती घेत
करणार का पुन्हा गप्पा
या आभासाच्या गोष्टी
क्षणोक्षणी मनी छळतात
तुमच्या खिश्याचा पेन
जपून ठेवलाय फार मी
कधी कधी हाती घेताच
नकळत डोळे वाहतात
नकोसे वाटते आज मज
हे दुनियादारीने केलेले कौतुक
आजही तुमच्या त्या शाबासकीसाठी
मनी जणू वेध असतात
बाबांच्या एका शब्दाने
जग जिंकल्याचा भास होई
त्या प्रेमावाचून जणु
आयुष्याला अर्थ नाही
क्षितिज वाटावे कमी
असे अथांग विश्व माझे
आठवणी त्यांचा नेहमी
माझ्या सोबत राही
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
अनुसूचित जाती,जमातीवरील वाढणारे अत्याचार ही चिंतेची बाब आहे. सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतील,समानता अलीकडे कुठंही नांदतांना दिसतं नाही ...
-
तुझ्या क्रूरतेचा कळसच मानवा इतका चढतो आहे जीव घेऊनी कोणाचा तो महल बांधतो आहे तुझ्या हृदयातील सांग गेली कुठे ती मानव...
-
स्त्री देशातील महत्त्वाचा घटक आहे पण आजही स्त्रीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह दिसून येतात.पूर्वीपासून ते आजच्या एकविसाव्या शतकात पर्यंतचा ...
-
पाहता ते घाव हाताचे काळी माती रडू लागली ओरबडलेल्या काट्याने रक्ताने ती नाहुण गेली त्या अनवाणी पायाला ती वहाण मायेची झाली बळीराजा तो लेक तिच...
-
शब्द तेच आहेत, कानामात्रा बदलला की अर्थ बदलतो.... शब्द बदलले की आम्ही ही बदलतो! आम्ही माणुसच; पण आम्हाला या शब्दांच्या मा...
-
हे सागरा तुझ्यातही सामावणार नाही एवढा मोठा दुःखाचा सागर माझ्या मनात आहे ! कधी डोळ्यातून तर कधी मनात वाहती अश्रू धारा ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा