गुरुवार, १८ जून, २०२०

जगुन पहावं थोडं आपल्यासाठी.........


आपण आयुष्य किती वर्षे जगतो याच्यापेक्षा आपण आयुष्य कसे आणि किती चांगल्या प्रकारे जगतो हे महत्त्वाचे असते. एखादा माणूस छोट्याशा आयुष्यामध्ये कधी कधी मोठे काम करून जातो तर तेच काम मोठ्या माणसाला आयुष्यभर करता येत नाही. माणूस सगळं आयुष्य हे अनुभवातून शिकत असतं अनुभवाचं पुस्तक हे जगातील सगळ्यात पुस्तकापेक्षा मोठं आहे. आपण किती पुस्तक वाचले हे कधीही महत्त्वाचं नसते, महत्वाचे असते आपण त्या पुस्तकांमधून काय घेतो ,अनुभवाचे पुस्तक वाचण्यासाठी कधीकधी आई-वडिलांच्या हृदयामध्ये झाकून पाहिले पाहिजे.जगात कोणीही करील नाही, कोणीही करणार नाही, एवढा मोठा त्याग कसा करायचा हे आई-वडिलांचे हृदय वाचल्या नंतर समजून जाते .मोठं शिक्षण घेतल्यानंतर कालपर्यंत सामान्य जीवन जगणारी मुलगा अचानक मोठे झाल्यानंतर, मोठ्या पदावर गेल्यानंतर त्यांना सामान्य वाटणाऱ्या आई वडिलांचा कमीपणा वाटायला लागतो , त्यांची साधी बोली त्यांचं राहणीमान यांनी त्यांचा जणू अपमानच होतो समाजामध्ये, अशी एक नाही तर अनेक उदाहरणे आपल्या समाजामध्ये पाहायला मिळतात . माणूस आयुष्य तर जगतो पण तो सदैव लोकांसाठी जगतो. कोण काय म्हणेल हा जणू त्याच्या प्रतिष्ठेचा विषय बनून जातो .प्रतिष्ठा जपता जपता माणसाला हव असलेल आयुष्य तो जगतो का.......? हा विचार एकदा तरी माणसाने करावा. लहान पासून सुरू झालेला आयुष्याच्या प्रवासात कधीतरी कुठेतरी थांबणार आहे आणि हे निश्चितच असते त्यामुळे इतरांचा विचार न करता आपले आयुष्य काही वेळासाठी तरी आपल्या मनाने जगून पहावे .इतरांचा विचार करता करता आपल्या लोकांना दुखवू नये.शेवटी प्रतिष्ठेच्या कोरड्या भिंतीत अडकलेल्या मनाला एक वेळ बंधनमुक्त करून पहा आणि जगा आपल्याला हवा असलेला आयुष्य निर्भिडपणे ,कुठलाही विचार न करता स्वच्छंदपणे , तेव्हा मुक्तपणे फुलुद्या मनामध्ये आयुष्याचे गीत ,आणि गात रहा आपल्या धुंदीत..........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा