सोमवार, १७ मे, २०२१
पुन्हा नव्याने पालवी फुटावी......!
सुकलेली पाने गळून जावी
पुन्हा नव्याने पालवी फुटावी
असेच घडो आयुष्यी आमच्या
सुखाची किरणे पुन्हा यावी..!
आव्हानांना पेलत पुढे जाऊन जिंकण्याची सवय माणसाला आहे , माणूस कधी घाबरला नाही कुठल्याही परिस्थितीत! संकटे आली आणि संकटे गेली तो मात्र सदैव परिस्थिती सोबत लढत राहिला.त्याचप्रमाणे हे कोरोना नावाचे संकटही काही काळापुरते आहे .संपूर्ण मानवी जीवन विस्कळीत करून टाकणाऱ्या या व्हायरसने सगळीकडे हाहाकार करून टाकला.
अगदी सर्व सुरळीत चालू असताना अचानकच आलेल्या या वादळाला सामोरं जाणं इतकं सोपं नव्हतं तरीही माणूस त्याला धैर्याने सामोरे जात आहे. सुरळीत आयुष्य थांबल्या गेले, हातचा बेरोजगार गेला, लोकांवर उपाशी राहण्याची वेळ आली. दुसऱ्या लाटेने तर हाहाकारच करून टाकला. डोळ्यासमोर आपली माणसे जात राहिली,आणि लोक निमूटपणे पाहत राहिली. ग्रामीण भागामधील दयनीय अवस्था डोळ्यांनाही बघवत नाही .ग्रामीण भागामध्ये कुठल्याही प्रकारचे हॉस्पिटल आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने उपचारा अभावी लोकांचा मृत्यू होतो आहे.लोकांकडे पैसे नाही, खाण्यापिण्याचे डोळ्यासमोर भलेमोठे प्रश्न असताना या परिस्थितीसोबत लढने हे खूप मोठे आव्हान आहे. कुठल्याही व्यक्तीने हा कधीही स्वप्नामध्ये विचार केला नव्हता की अश्या परिस्थितीला त्याला सामोरे जावे लागेल म्हणून !
घरामध्ये राहून राहून मानसिक आरोग्य सुद्धा धोक्यात आलेले आहे . एका व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने अगदी सहज रित्या पसरणाऱ्या कोरोनाला कुठल्याही प्रकारचे नियम न पाळल्याने ही वाढण्याचे काम काही महाभाग करीत आहे. कोरोणा आहे की नाही यावर होणारे विनोद सगळ्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात न घेतल्याचे परिणाम हे आपणास दुसऱ्या लाटेच्या स्वरूपात दिसले .त्यांना झाला त्यांनी कोरोनाला सिरीयस घेतले आणि ज्यांना नाही झाला ते अजूनही विनोद करीत आहेत.
सरकार आणि नागरिकांनी जर वेळोवेळी सगळ्या उपाय योजना आणि नियमांचे पालन केले असते तर कुठेतरी अजूनही आपणास कोरोणावर यशस्वीरीत्या मात केल्याचे दिसले असते.ज्यांना परिस्थितीचे गांभीर्य नाही ते स्वतःच्या आरोग्यासोबत दुसऱ्यांच्या सुद्धा आरोग्यासोबत सुद्धा खेळत आहेत.हा जगण्या मरण्याचा खेळ कधी बंद होईल हा सामान्य माणसाचा निरागस प्रश्न!
एक झाले की एक संकटे मानवी आयुष्यावर येत आहेत .आधीच कोरोनामुळे खचलेला माणूस आणि त्यात पुन्हा नव्याने येत असलेल्या 'तौत्के' वादळाला सामोरे जाण्याची क्षमता माणसाने आणावी तरी कुठून ?अशावेळी नकारात्मकता ,जगण्यावर असलेल प्रेम कमी होण्याची शक्यता असते, पण जिथे मार्ग संपतो तेथून खरे आयुष्य सुरु करायचे ! न डगमगता ... ! कुठलीही वेळ ही कायम स्वरुपी नसते हे लक्षात असू दया. सद्या जरी मनात काहूरलेला अंधार आहे,पण उदयाला नक्किच नव्या आयुष्याचे किरणे घेऊन उगवणारी पहाट ही आपल्या आयुष्यात येईल..! ज्या प्रमाणे झाडाची सुकलेली पाने गळून पुन्हा त्याला नव्याने पालवी फुटते तसेच मानवी आयुष्यामध्ये हे कोरोना नावाचे संकट आणि हे येणारे वादळे जाऊन पुन्हा नव्याने आपल्या आयुष्यात सुखाची पालवी फुटेल...!
✍ ॲड. विशाखा समाधान बोरकर
रा.पातुर जि. अकोला
18/05/2021
*****************************************
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
एक सांगु का बाबा, तुम्ही ना मला रोज आठवता. जेव्हा कुठली मुलगी तिच्या बाबाचा हात ठेवून चालत असते. तेव्हा तुमच्या ही लाडकीचे काळीज आठव...
-
ग्रामीण भागात शिकणाऱ्या मुला- मुलींच्या शैक्षणिक समस्या हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे . प्रामुख्याने मुलींना शिक्षण घेत असताना अनेक गोष्टीचा ...
-
बाप हृदय लेकराचं बाप अवघे आकाश बाप श्वास जगण्याचा बाप घरट आयुष्याचं बाप वरून रागीट पण त्याचं हृदय फुलाच बाप पाहतो स्वप्नं आपल्या ...
-
शब्द तेच आहेत, कानामात्रा बदलला की अर्थ बदलतो.... शब्द बदलले की आम्ही ही बदलतो! आम्ही माणुसच; पण आम्हाला या शब्दांच्या मा...
-
उघडून दार शिक्षणाचे घडवली मोठी स्त्री क्रांती स्त्री शिक्षणाचे तुम्ही प्रणेता धन्य धन्य तुम्ही क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा