शुक्रवार, १५ मे, २०२०

आभासी जीवन आणि वास्तव .........



माणूस स्वप्नाळू वृत्तीचा आहे त्याची खूप सारे स्वप्न असतात आयुष्यात, आणि ते पूर्ण करण्यासाठी तो दिवस-रात्र प्रयत्न करीत असतो, त्याला काहीतरी नवीन हवं असतं.आजच्या काळात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती पेक्षा वेगळा दिसण्यासाठी नेहमी प्रयत्न करीत असतो, आणि हा वेगळेपणा सगळ्यांना हवाहवासा वाटत असतो. त्यामुळे आपण इतरांपेक्षा वेगळ असाव ही माणसाची वृत्ती होऊन गेली आहे.आज प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन आहे, घरात टीव्ही आहे ,कम्प्युटर आहे .टीव्ही मध्ये दिसणारे भव्य बंगले ,मोठ्या मोठ्या गाड्या, थाट नोकर -चाकर,या आभासी गोष्टी आपण पाहत असतो. आणि नकळत आपण त्या आभासी जगात शिरत असतो . त्या ही आपल्या जवळ असाव्या हा आपला प्रयत्न चालू राहत असतो. ही स्वप्न वृत्ती असणे चुकीचे नाही पण ही बाळगून आपल्या वास्तव जीवनातील आनंदा सोडून देणे हे मात्र चुकीचा आहे.
आणि आज होतय पण तेच . वास्तव जीवन सोडून आजचा माणूस आभासी जीवनाकडे चालून मृगजळाच्या मार्गावर धावताना दिसतो आहे.जन्माला आल्यापासून माणसाचा जीवन प्रवास चालू होतो .तो कुठलातरी रोल प्ले करीत असतो आणि हा रोल आपल्यासाठी बनवलेला असतो आणि तो रोल श्रेष्ठ आहे असे म्हणून आपण जगावे .तुमच्यासाठी तो बनवलेला रोल दुसरा तिसरा कोणी करू शकत नाही त्यामुळे जर तुमच्या जीवनामध्ये आव्हान येत असतील तर ते आव्हाने तुमच्यापेक्षा चांगले प्रकारे निभावून कोणीही सादर करू शकत नाही. कारण तो तुमचा रोल आहे आणि तो तुम्हालाच सादर करून आयुष्याच्या रंगमंचावर आपला अस्तित्वाचा ठसा उमटवला लागेल.

सर्वांच्या आयुष्याची कहाणी ही वेगवेगळी असते .त्यामुळे आभासी जीवन बाजूला ठेवून वास्तव जीवनाचा आनंद घेऊन आपण आयुष्य जगले पाहिजे.कारण एका साधारण झोपडीमध्ये असलेला आनंद कधीकधी मोठ्या भव्य बंगल्यामध्ये पण नसतो. जिथे पैसा आहे तिथे समाधान असतेच असे नाही ,पण हे समाधान कधीकधी अर्ध्या भाकरीवर जगणाऱ्या सामान्य माणसाच्या चेहऱ्यावर दिसेल. स्वप्न पाहून स्वप्नपुर्ती करणे ही वेगळे आणि आभासी जीवन जगणे हे वेगळे . स्वप्नपूर्ती करण्यासाठी माणूस रात्रदिवस मेहनत करून जिद्द चिकाटीने ते पूर्ण करून दाखवतो. पण नुसता आभासी जीवन जगणारा माणूस मात्र नुसते स्वप्न पाहून काहीच करीत नाही हे चुकीची आहे. आणि आभासी जीवन जगून वास्तव जीवनाला विसरणे म्हणजे आयुष्यातील आव्हानाला हरण्या सारखा असते. माझ्याकडे हे असावं,माझ्याकडे ते असावं ,त्याच्या कडे ते आहे ,त्याच्याकडे हे आहे, हा विचार करण्यापेक्षा आपण आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान म्हणून जगावं किंवा आपल्याकडे असलेल्या गोष्टीचा आनंद घेऊन जिद्द ,मेहनत आणि परिश्रमाने इतरांचा उपहास न करता आपल्या आयुष्याला हवा तसा आकार द्यावा .

आयुष्याची स्पर्धा ही आपलीच आपल्या सोबत असते ,कारण ती जिंकण्यासाठी आपण आलेले आहोत. त्यामुळे आपल्या यशापयशाची तुलना कधीही कुणासोबत करू नये.आपले जीवन आपल्या पद्धतीने आनंदाने जगावे. शेवटी आभासी जीवनामध्ये आयुष्याचा अनमोल वेळ वाया घालवण्यापेक्षा वास्तव जीवनामध्ये मेहनतीने आपल्याला हवे तसे आयुष्य आनंदाने जगुन आपल्या आयुष्याला आकार द्यावा ......

1 टिप्पणी: