रविवार, ३० मे, २०२१
पुस्तक...
पुस्तक हातामध्ये पडल्यानंतर होणारा आनंद काही वेगळाच असतो.लहानपणी बाबा नेहमीच घरी पुस्तक आणायचे नवीन विषय, नवीन लेखक, सगळं वाचून झाल्यानंतर एक त्याच्यावर आमचं चर्चासत्र असायचं. बाबांना पुस्तकाचे विशेष आवड! पुस्तक वाचण्याची आवड भावंडांना सुद्धा ! पुस्तकप्रेमी घरामुळे घरामध्ये भरपूर पुस्तकं असायची. लहानपणी कळत नव्हतं हे लोक पुस्तकांमध्ये का इतके गुंतून जातात? तास न् तास हातामध्ये पुस्तक ठेवणे म्हणजे एक तपश्चर्याच नव्हे का? खुपच हुशार असतात ते लोक जे पुस्तक वाचतात असे मनोमन वाटायचं. घरामध्ये सर्व पुस्तक वाचायचे म्हणून मी काहीतरी नाटक म्हणून पुस्तक हातामध्ये घ्यायचे. सर्वांना कळावे की, मी पण पुस्तक वाचते म्हणून! बाकी अभ्यासाचेच पुस्तके जड जायचे तर बाकी पुस्तके वाचने दूरच !आताच्या परिस्थितीमध्ये त्या सगळ्या गोष्टी आठवल्या की मनातच हलके हसू येते, आमचे लाॅचे पुस्तके पाहून आम्हाला म्हणणारे खूप लोक आहेत, बापरे ! किती मोठ-मोठे पुस्तक आहे हे आणि कधी वाचता तुम्ही!नकळत हसायला येतं.लहानपणी नाटक म्हणून हातात घेतलेले पुस्तक पुढे पुढे नकळत छान सवय होऊन गेली आणि पुस्तके मित्र बनली. एक घट्ट मैत्री होऊन गेली त्यांच्यासोबत कधी न तुटणारी !
पुस्तक हे कुठलेही असो कुठल्याही विषयाची असो ते ज्ञान देण्याचे काम करते पुस्तकांमधून मिळणारे ज्ञान हे कधीच वाया जात नाही.पुस्तक वाचल्यानंतर माणुस वैचारिक होतो, त्याला चांगल्या वाईटाची जाणीव होते. सगळे जग तुमच्या सोबत भेदभाव करू शकेल; पण पुस्तक कधीही कोणासोबत भेदभाव करीत नाही ते सर्वांना सारखेच ज्ञान देते. त्यामुळे माणसाने नेहमी पुस्तक वाचले पाहिजे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
अनुसूचित जाती,जमातीवरील वाढणारे अत्याचार ही चिंतेची बाब आहे. सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतील,समानता अलीकडे कुठंही नांदतांना दिसतं नाही ...
-
माणूस स्वप्नाळू वृत्तीचा आहे त्याची खूप सारे स्वप्न असतात आयुष्यात, आणि ते पूर्ण करण्यासाठी तो दिवस-रात्र प्रयत्न करीत असतो, त्याला ...
-
कधी तरी बाबाच्या मनाच्या कोपर्यात जाऊन पहा त्या थककलेल्या चेहर्यावर प्रश्न दिसतील दहा त्या थकलेल्या चेहर्याचे उत्तर तुम्ही शोधून दया न क...
-
उद्या पुन्हा काही क्षणासाठी का असेना आभासीच राष्ट्रभक्तीची झगमगाट दिसेल, प्रत्येक स्टेटसला, प्रत्येक प्रोफाईल ला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्...
-
सुकलेली पाने गळून जावी पुन्हा नव्याने पालवी फुटावी असेच घडो आयुष्यी आमच्या सुखाची किरणे पुन्हा यावी..! आव्हानांना पेलत ...
-
शब्द तेच आहेत, कानामात्रा बदलला की अर्थ बदलतो.... शब्द बदलले की आम्ही ही बदलतो! आम्ही माणुसच; पण आम्हाला या शब्दांच्या मा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा