रविवार, ३० मे, २०२१
स्मशाने ही आता बोलकी झाली
स्मशाने ही आता बोलकी झाली
रडु लागली माणसांवर
रास लागली कशी इथे रे
काळ धावला जगण्यावर
भेटीगाठीची तूटली दोरी
सरणही न लाभे इथे कुणा
कुठे वाहती प्रेत हजारो
कुठे फेकती रस्त्यांवर
अश्रु वाहती क्षणोक्षणी
रोज हृदयावरी घाव नवा
उध्वस्त झाले घरे हजारो
वादळ दु:खाचे काळजांवर
निशब्द झाली रस्ते माणसे
निशब्द झालेय जगणेही
दूर जाहली माणसे अचानक
वेळ हातीही असल्यावर
जड झाली पावले आता
चालता वेदनेच्या काट्यांवर
जन्मभराची पायपीट कुठे
वेध लागले घरट्यांवर
सोकलेला चेहरा तो
मरणयातना भोगतोय रोज
मिळेल का गोळी कुठली
जड भाकरी सांजेवर
बंदिस्त विळखा काळाचा
प्रकाश कुठे ना दिसे इथे
कुठे असे रोज दिवाळी
कुठे निजती पाण्यावर
वेळ ही कठिण जरी
निघुन जाईल धीर धरा
धावून जा कठिण समयी
मिळुनी वार करू प्रसंगावर
✍ ॲड. विशाखा समाधान बोरकर
******************************************
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
अनुसूचित जाती,जमातीवरील वाढणारे अत्याचार ही चिंतेची बाब आहे. सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतील,समानता अलीकडे कुठंही नांदतांना दिसतं नाही ...
-
तुझ्या क्रूरतेचा कळसच मानवा इतका चढतो आहे जीव घेऊनी कोणाचा तो महल बांधतो आहे तुझ्या हृदयातील सांग गेली कुठे ती मानव...
-
स्त्री देशातील महत्त्वाचा घटक आहे पण आजही स्त्रीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह दिसून येतात.पूर्वीपासून ते आजच्या एकविसाव्या शतकात पर्यंतचा ...
-
पाहता ते घाव हाताचे काळी माती रडू लागली ओरबडलेल्या काट्याने रक्ताने ती नाहुण गेली त्या अनवाणी पायाला ती वहाण मायेची झाली बळीराजा तो लेक तिच...
-
शब्द तेच आहेत, कानामात्रा बदलला की अर्थ बदलतो.... शब्द बदलले की आम्ही ही बदलतो! आम्ही माणुसच; पण आम्हाला या शब्दांच्या मा...
-
हे सागरा तुझ्यातही सामावणार नाही एवढा मोठा दुःखाचा सागर माझ्या मनात आहे ! कधी डोळ्यातून तर कधी मनात वाहती अश्रू धारा ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा