बा भीमा,
तुझ्या मताचे पाच लोक
आजही भेटलेच नाही
स्वार्था पलिकडे त्यांना
आजही समाज दिसला नाही
गिळत आहे लाचारीचे
ते दोन तुकडे फक्त
चळवळ विकणार्या या शहाण्यांना
आज चळवळीचेही भान नाही
बा भीमा,
रात्रंदिवस जागून
उभारलेली ती लेखणीची चळवळ आता
मतभेदात विखुरली केव्हाचीच
तू म्हट्ले शिका, संघटीत व्हा,संघर्ष करा
पण आम्ही शिकलो,
संघटीत व्हायचे विसरून
आम्ही आपसात संघर्ष करु लागलो
आज ही गावात आमच्या
महारवाडाच म्हणतात आपल्या वस्तीला
केली जातात अत्याचार आयबहिणीवर
अन घडवून आणले जाते
खैर्लाँजलीसारखे कांड
बा भीमा,
निवडणूका आल्या की दिले जाते
पोरांच्या हाती व्यसनाचे अवजारे
दोन पैश्यासाठी आपलीच माणसे देतात
आपल्याच माणसाविरुद्ध वाईट नारे
वैरवाचे संबंध छान पार पडतात हे
वेळ येताच करतात
एकमेकांवर दगडाचे ही मारे
बा भिमा,
तू म्हटले
शासनकर्ती जमात व्हा
पण पार वाट यांनी लावली
या अनमोल शब्दाची
आपला व्यक्ती राहिला उभा
की त्याला खेचणारे मिळतील
आपलेच क्षनोक्षणी पावलोपावली
काळजी वाटते फार
आपल्या समाजाची
खुप भोडा समाज आहे आपला
जय भिम म्हटले कोणी
कीं अभिमान वाटतो
तूझे लेकरे असण्याची
बा भिमा,
इतकेच वाटते की,
हे झोपलेली जागी माणसे व्हावे
आपसातील मतभेद विसरावे
पुन्हा विखुरलेले क्रांतीचे सुर जुळावे
अन्यायवीरुद्ध सर्वानी पेटून उठावे
शनिवार, २४ ऑक्टोबर, २०२०
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
अनुसूचित जाती,जमातीवरील वाढणारे अत्याचार ही चिंतेची बाब आहे. सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतील,समानता अलीकडे कुठंही नांदतांना दिसतं नाही ...
-
एक सांगु का बाबा, तुम्ही ना मला रोज आठवता. जेव्हा कुठली मुलगी तिच्या बाबाचा हात ठेवून चालत असते. तेव्हा तुमच्या ही लाडकीचे काळीज आठव...
-
बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण व उत्सव आहे. हा सण जगभरात विशेषत: भारतात वैशाख पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जा...
-
सध्या परिस्थिती मध्ये दिशा भटकलेला युवा पिढीला मार्ग दाखवणारा लघुचित्रपट प्रदर्शित झाला. आपल्या लिखाणाने सर्वांच्या हृदयावर राज्...
-
हे सागरा तुझ्यातही सामावणार नाही एवढा मोठा दुःखाचा सागर माझ्या मनात आहे ! कधी डोळ्यातून तर कधी मनात वाहती अश्रू धारा ...
-
ग्रामीण भागात शिकणाऱ्या मुला- मुलींच्या शैक्षणिक समस्या हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे . प्रामुख्याने मुलींना शिक्षण घेत असताना अनेक गोष्टीचा ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा